ताज्या घडामोडी

उत्तर प्रदेश , उत्तराखंड ,मनीपूर , गोवा या चार राज्यातील भाजपाच्या विजयाचा गारगोटीत आनंदोत्सव..

गारगोटी ; उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मनीपूर गोवा, या चार राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने मिळवलेल्या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास पुन्हा दृढ झाला असून भाजपा देशभरातील जनाधाराचा कौल स्पष्ट झाला आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केले.
गारगोटीतील हुतात्मा क्रांती चौकात चार राज्यातील भाजपाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना ते बोलत होते. यावेळी श्री पाटील पुढे म्हणाले विश्वासघाताने महाराष्ट्रातील सत्तेवर आलेल्या सरकारमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन घटक पक्षांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. त्यामूळे त्यांच्या पक्षाच्या जनसामान्यामधील अस्तीत्वाचा प्रश्न निर्माण झाला असून येत्या काळात देखील महाराष्ट्रातही भाजपाचा वारू कोणीही रोखू शकणार नाही.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, जिल्हा चिटणीस सुभाष जाधव, तालुका संघाचे संचालक संतोष पाटील यांची भाषणे झाली…

यावेळी विलासराव बेलेकर यांचे हस्ते हुतात्मा क्रांतीज्योतीस पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. व त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी भारत माता की जय , वंदे मातरम् , भाजपाचा विजय असो , देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परीसर दणाणून सोडला.
त्यानंतर साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संतोष पाटील, डॉ. सुभाष जाधव, नामदेव चौगले,सुनिल तेली, भगवान शिंदे, राहुल चौगले, विलासराव बेलेकर , रणजित आडके, बाजीराव देसाई , सुनिल पाटील, रमेश रायजादे, अशोक येलकर , अमोल पाटील, संग्राम शिंदे, अवधुत राणे, आनंदा रेडेकर, संभाजी नलगे ( सरपंच ) ए.डी. कांबळे, रंगराव कांबळे, सुहास कांबळे, पोपट जमादार, पी.बी. खुटाळे, संजय भोसले, सचिन हाळवणकर, निवास देसाई, सुरेश सुतार, लखन लोहार, आजित सुतार , सुरेश किल्लेदार,यांचे सह भाजपाचे कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थीत होते..

Related Articles

Back to top button
??????