ताज्या घडामोडी

लोक तुम्हाला ५० वर्षांपासून सहन करत आहेत

शरद पवारांवर अमित शाहंनी डागली तोफ

मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज जळगाव येथे भाजप युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, यांच्यासह सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रातील लोक तुम्हाला सहन करत आहेत. त्याचा हिशोब त्यांनी द्यावा. या नेत्यांना आपल्याच मुलांना पदावर बसवायचे आहे, उद्धव ठाकरे यांना आदित्य यांना तर शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे. तर सोनिया गांधी यांना राहूल यांना पंतप्रधानपदी बसवायचे आहे. अशा शब्दात त्यांनी घराणेशाहीवर टिका केली.

पुढे त्यांनी सांगितले की काँग्रेसने व्होट बँकेच्या भितीने देशाच्या संस्कृतीला मागे नेण्याचे काम केले आहे. राम मंदिर पूर्वीच व्हायला पाहिजे होते. पण काँग्रेसने ७० वर्षे रामल्लाला तंबूमध्ये बसविले. पण करोडो देशवासियांचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केले. मोदींनी भव्य राममंदिर बांधून रामल्लाची प्राणप्रतिष्ठा केली. काशी विश्वनाथ कॅरिडॉर, वन रँक वन पेन्शन दिल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीवर टिका करताना त्यांनी म्हटले की महाराष्ट्रात तिन चाकी रिक्षा सुरु आहे पण त्या रिक्षाची तिन्ही चाके पंक्चर झाली आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
??????