मुंबई: मनोज जरांगे पाटील हा हकेखोर माणूस आहे. त्याला अक्कल नाही अशा शब्दात जरांगे यांचे मित्र व मराठा आंदोलनातील एक सहकारी अजय महाराज बरासकर यांनी टिका केली आहे. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपले मत मांडले. अध्यादेश व अधिनियम यातील फरक जरांगेना कळत नाही. त्यांनी मराठा समाजातील अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या आहेत. तो हेकखोर माणूस असून कोणत्याही शब्दावर अडून बसतो. त्यांच्यामुळे मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हसा हल्लाबोल बरासकर यांनी केला आहे.
मी प्रसिद्धी आणि पैशासाठी काम करत नाही, अनेक ठिकाणी किर्तन करतो त्याचेही पैसे घेत नाही. गेले अनेक दिवस मनात खदखद होती ती बाहेर पडली आहे. त्यानंतर आता मला अनेक फोन येत आहेत. गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. पण मला सत्य सांगायचे आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराज यांचा अपमान केला आहे, तो मी सहन करणार नाही.,
जरांगे वेळोवळी भूमिका बदलत असतात. १० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी कोणतीही बैठक घेतली नाही. परंतू एक फोन आला आणि ते लगेच उपोषणाला बसले. त्यावेळी लोकांचा विरोध होता. समाजातील कोणीही अंतरवलीला गेले नाही. लोक जमत नाहीत म्हणून जरांगे संतापले होते. ‘लोक जमवता येत नाही मी उपोषण कसे करु” असे बोलल्याचे रेकॉर्डिंग असल्याचा दावा बरासकर यांनी केला आहे.
मी अनेक वर्षे आंदोलनासाठी काम करत आहे. मध्यंतरी अंतरवली सराटी येथे घटना घडली व मी पुन्हा आंदोलनात सक्रीय झालो. यापूर्वी कधीही माध्यमांसमोर आलो नाही. जरांगे यांच्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत ते अनेक गुप्त मिटिंग घेतात पहिल्यांदा त्यांनी बीड येथे कन्हैया हॉटेल येथे मिटींग घेतली. दुसरी मिटींग राजंणगावला पहाटे चार वाजता झाली. त्यानंतर पुणे, लोणवळा, वाशी येथे गुप्त मिटींग झाल्याचा आरोप अजय महाराज बरासकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.