ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यावर कारवाई करावी : गवळी समाजाची मागणी

 

कोल्हापूर :  कोल्हापूर शहरातील गवळी समाजातील एक अल्पवयीन मुलीला एका मुस्लीम युवकाने फूस लावून पळवून नेले असून संबधितांवर कारवाई करुन पिडीत मुलीस न्याय मिळवा अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर गवळी समजाच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पो. नि. दत्तात्रय नाळे यांना दिले.

कोल्हापूर शहरातील गवळी समाजातील एक अल्पवयीन मुलीला एका मुस्लीम युवकाने फूस लावून पळवून नेले असून लव्ह जिहादची घटना घडली आहे. याबाबत रितसर फिर्याद मुलीच्या वडीलांनी आलताफ काझी (वय २३) आर. के. नगर उद्यान शेजारी, सोसायटी नं ६ कोल्हापूर याच्या विरोधात १५ दिवसांपूर्वी दिली आहे. तरीही त्याचेवर आणि त्याला सहकार्य करणारे त्याचे कुटुंब, नातेवाईक, सहकारी यांच्यावर कोणतेही कारवाई झालेली दिसून येत नाही. तशीच पोलिसांकडून माहिती व सहकार्य मिळत नाही असे या निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी युवराज गवळी, उदय डाकवे, रणजित डाकवे , बाजीराव गावकर, वैभव चीले, अमोल गवळी, दिपक दाभोलकर , राहुल चिले, अभिजित पोरे, बंडा साळोखे, संदीप गवळी, रमेश दिवेकर, विठ्ठल झोरे, चंद्रकांत गवळी, संग्राम गवळी, आनंदा पवार यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

बुधवारी सकाळी  आ. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत जन-आक्रोश आंदोलन ठरले आहे. हे आंदोलन सामान्य जनतेचे आंदोलन असून सर्व हिंदुत्ववादी संघटना, सर्व तालीम, मंडळे व सर्व हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Related Articles

Back to top button
??????