ताज्या घडामोडी

जिल्ह्यात 10 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू

कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजास ओ.बी.सी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी  24 फेब्रुवारी पासून प्रत्येक गावात एकाचवेळी रास्ता रोको, विविध प्रकारची आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दि. 25 फेब्रुवारी पासून श्री क्षेत्र जोतिबा, वाडी रत्नागिरी येथे खेटे सुरु होणार आहेत. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ. साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 10 मार्च 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.

Related Articles

Back to top button
??????