ताज्या घडामोडी

मेन राजाराम हायस्कूल व भवानी मंडप जुनिअर कॉलेज कोल्हापूर यांच्या माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

कोल्हापूर: माजी विद्यार्थी 2011विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते . यावेळी दहावीच्या वर्गातील असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सर्व विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन या कार्यक्रमाचे नियोजन केले होते आपल्या वेळेची शाळां व आत्ताची शाळा यातील खूपच बदलल पाहून त्यांना गहिवरून आले. 2011साली अकराशे विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि आता सध्याची स्थिती फक्त 60 विद्यार्थी पाचवी ते दहावी या वर्गात शिकत आहेत. माजी विद्यार्थ्यांनी पटसंख्या वाढीसाठी संकल्प केला आहे आपण ज्या शाळेत शिकलो काहीतरी देणं लागतं त्याने पट वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

मुलांन लागणारे शालेय साहित्य वाटप  तसेच गरीब व गरजू मुलांचा शैक्षणिक खर्च तसेच त्यांची राहण्याची सोय करण्यात येणार आहे. गरीब व गरजू मुलांनी या शाळेत ऍडमिशन घेऊन आपली शालेय शिक्षण पूर्ण करावे अशी आव्हान माजी विद्यार्थी यांनी केले आहे. यावेळी प्रास्ताविक सागर नाईक यांनी केले सूत्रसंचालन सचिन पेडणेकर यांनी केले. यावेळी जावेद पठाण, आर वाय नाईक, जावेद पठाण, शैलेश गायकवाड, मुरली सुतार, विशाल चौगुले, रोहन केसरकर, ओमकार जाधव, किमया लोखंडे, सागर केसरकर, पूजा स्वामी सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button
??????