कोल्हापूर उत्तरसाठी शिव सेनेचा निर्धार मेळावा
खा. विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न
कोल्हापूर ; जयश्री जाधव म्हणाल्या, महाविकास आघाडीचे कुटुंबप्रमुख व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे गेल्या दोन वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करीत आहेत. उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस एकत्रित आले असून, राज्याला विकासाच्या नव्या वळणावर नेले आहे. माझे पती व दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) हे या कुटुंबाचे सदस्य होते. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर कुटुंबप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरेसाहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या पोटनिवडणुकीसाठी मला पाठिंबा दिला याबद्दल मा. उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानले.
शिवसेनेत जो आदेश मातोश्रीवरून येतो तो तंतोतंत पाळला जातो. तशी प्रथा शिवसेनेत आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्रित असून, सत्तेसाठी कोणतीही पातळी गाठणाऱ्या भाजपला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता त्यांची जागा नक्की दाखवून देईल हा विश्वास आहे.
आजच्या या कार्यक्रमास स्व. आण्णांचे कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पाठबळ देणाऱ्या सर्वच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते. ना. उदय सामंत, खा. विनायक राऊत, अरुण दुधवडकर, राजेश क्षीरसागर, खा.संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, मा. संजय पवार, मा. विजय देवणे मुरलीधर जाधव, जयवंत हरूगले यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. यामुळे मला पाठबळ मिळाले असून, यांच्यासोबतच जिल्ह्यातील शिवसैनिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने मला मोठा आधार आणि बळ मिळाले आहे.