ताज्या घडामोडी

२५ मतदारसंघाचे जागावाटप जाहीर करणार

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

कोल्हापूर :
सध्या सर्वत्र लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. राज्यात सध्या महायुती व महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये थेट लढती होण्याची शक्यता आहे. शिवसेने मधून शिंदे यांचा गट बाहेर पडला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट बाहेर पडला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात जागावाटपाचा तिढा तयार झाला आहे. भाजपाला विरोध म्हणून राष्ट्रीय पातळीवर ‘इंडीया ” आघाडी तयार झाली आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्ष मुख्य आहे तसेच इतर पक्षही प्रत्येक राज्याप्रमाणे कमी अधिक महत्वाचे आहेत. त्यामूळे इंडिया आघाडीत जागावाटपावरुन मतभेद असल्याची चर्चा होती. यावर बोलताना पाटील म्हणाले दोन दिवसात इंडिया आघाडीची बैठक पार पडणार असून २५ जागा जाहीर होणार आहेत. २५ जानेवारीला जावाटप जाहीर होणार आहे. तसेच इंडिया आघाडीत कोणतेही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button
??????