ताज्या घडामोडी

भटक्‍या विमुक्‍त समाजासाठी बांधलेल्‍या सदनिकांमध्ये 200 कोटीची फसवणूक

पुणे :  पुणे येथील वारजे माळवाडीमधील शासनाने भटक्‍या आणि विमुक्‍त समाजासाठी शासनाने साडेचार एकर जागा राखीव दिली होती. त्‍या ठिकाणी बिल्‍डरच्‍या मदतीने 396 सदनिका बांधून त्‍यापैकी 218 जणांकडून रक्‍कम घेऊनही त्‍यांना सदनिका न देता त्‍यांची परस्पर विक्री करत गैरव्यवहार केला. यामध्ये चेअरमनसह दोघांवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक अशोक वेताळ (40, रा. गंधर्वनगरी ,बिल्डीग मोशी) यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरून, रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीचे चेअरमन अंबादस दत्तात्रय गोटे (वय 70, आशिर्वाद गार्डन सोसायटी, शिवणे,पुणे. मुळपत्ता रा. जोशीवाडी, तहसिलदार कचेरी शेजारी, पो. घोडनदी, ता. शिरुर, जि.पुणे) आणि गणेश बंजरंग माने (वय 42 वर्षे, रा.जोशी वाडी,शिरुर,जिल्हा पुणे ) व इतरांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 1990 ते मार्च 2022 दरम्‍यान वारजे माळवाडी येथील स.न 35/2 रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीत हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रामनगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेचे चेअरमन अंबादस गोटे तसेच सेक्रेटरी गणेश माने व इतरांनी रामनगर सोसायटीचे मुळ 218 सभासदांना शासनाकडुन मिळणा-या जागेवर घरे बांधुन देतो असे सांगितले. फिर्यादी व इतर सभासदाकडुन सन 1990 पासुन अदयाप पर्यंत वेगवेगळया प्रकारे रोख रक्कमा घेतल्‍या. त्याचे करिता शासनाकडुन 1 हेक्टर 76 आर जमीन प्राप्त केले. तसेच त्यावर 396 प्लॅटस बांधुन ते रामनगर सोसायटीचे मुळ 218 सभासदांना दिले नाही. तर आर्थिक लाभाकरिता इतर लोकांना शासनाच्या परवानगी शिवाय विकले.

Related Articles

Back to top button
??????